मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.त्यांनी नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची चाचपणी शिवसेनेने केली आहे त्यावर माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे .
आपल्या अधिकृत अकाऊंटवरून त्यांनी ट्विट केले आहे ते म्हणाले की ,” संज्यासारखी लोक पेंग्विनचा पण राहुल गांधी करणार, देव करो आणि असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये,
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरें यांनी निवडणूक न लढता अनेक लोकांना आमदार,खासदार,मंत्री बनवले. मात्र या सर्वांचा रिमोट कंट्रोल मातोश्रीमध्ये बाळासाहेबांनी स्वतःच्या हाती ठेवला. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते असलेले आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल.
पेंग्विनचा पण राहुल गांधी संज्या सारखी लोकं नक्की करणार. देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये. https://t.co/zthjulDXGY
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2019