जयसिंगपुर बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे धनगर समाज सत्ता संपादन महाअभियान मेळाव्याचे २७ जूलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनीलभाऊ खोत यांनी दिली.
राज्यात जवळपास २ कोटी ३५ लाख धनगर समाजाचे मतदार आहेत. परंतु धनगर व धनगड या र आणि ड च्या न्यायालयीन प्रक्रियेत गेली ७० वर्षे धनगर समाज अडकला आहे. त्यामुळे धनगर समाजाचे अर्थकारण आणि राजकारण सत्ताकारण, उद्योग शिक्षण या सर्व सुविधांपासून तो वंचित राहिला आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेला धनगर समाज परंतु त्याला आतापर्यंत एकही मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे धनगर समाजावर झालेल्या अन्यायाला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून समाजाशी संवाद साधून आरक्षण, संरक्षण आणि सत्ता संपादन करून देण्यासाठी पट्टणकडोली येथे धनगर आरक्षण संरक्षण सत्ता संपादन मेळावा शनिवारी माज हा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, नवनाथ पडळकर, गोपीचंद पडळकर, यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे.
तर धनगर समाजातील सर्व प्रमुख नेतेही तेथे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात धनगर समाजाची भुमिका स्पष्ट केली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धनगर बांधवांनी शनिवारी मोठ्या संख्येने पट्टणकडोली येथे उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील खोत यांनी सांगितले.