बहुजननामा ऑनलाईन : नवीन मोटर वाहन अधिनियम कायदा लागू झाल्यानंतर ट्रॅफिक पोलिस प्रत्येक चौका- चौकात सक्रिय झाले आहेत. वाहनांवर मोठं – मोठी चलान आकारले जात आहेत. नवीन नियमांचे पालन करण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी नागरिक पोलिसांबरोबर वाद घालत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यावर पोलीस आधी गाडीची चावी काढून घेतात, त्यामुळे अनेकजण वाद घालण्यास सुरुवात करतात. परंतु कायद्या अंतर्गत पोलिसांना गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार नसतो.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील पद्मश्री ब्रह्मदत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत, कोणत्याही वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढून घेण्याचा किंवा गाडीची हवा काढून घेण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही वाहन चालकाशी गैरवर्तन करण्याचा अधिकार देखील कायद्यात नमूद केलेला नाही. जर तुमची गाडी पोलीस अडवत असतील तर त्यांना सहकार्य करा, परंतु जर तुमच्या गाडीची चावी किंवा हवा काढून घेण्यात प्रयत्न करत असतील तर, त्याचा विडिओ काढून त्यांच्या उच्च अधिकाऱ्याला पाठवा, ज्याद्वारे त्यांच्यावर विभागीय कारवाई होईल. जर ते दोघेही मिळालेले असतील तर तुम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ शकता. त्यातही तुम्ही जे BPL धारक, महिला किंवा अपंग असाल तर तुम्हाला मोफत कादेशीर मदत केली जाते. संबंधित वाहतूक पोलीसांवर नागरीक आणि मानवी कायद्याचे हनन केल्या अंतर्गत कारवाई करा, ज्यामुळे तो पोलीस सस्पेंडदेखील होऊ शकतात.
त्यामुळे पोलिसांनी देखील हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि, कायदा त्यांना गुंडगिरी किंवा गैरवर्तन करण्याच्या अधिकार देत नाही. ते फक्त दंड वसूल करू शकतात आणि गाडी ताब्यात घेऊ शकतात. त्यामुळे कायद्याचे पालन करण्याच्या नावाखाली ते गैरवर्तन करू शकत नाही तसेच कोणत्याही प्रकारे पैसे उकळू शकत नाही, असे देखील पद्मशी यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे माहिती अधिकारी कार्यकर्ता अनुभव सुखिजा यांनी सांगितले कि, पोलीस हाताने गाडी थांबवू शकतात आणि तपास करू शकतात. जर चालक तपासला सहकार्य करत नसेल तर, तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. परंतु त्यासाठी पोलिस शिवीगाळ किंवा मारहाण करू शकत नाही.