वॉशिंग्टन : वृत्तसंस्था- पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रात आपल्या वक्तव्यात मान्य केलं आहे की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरबाबत संबोधित करताना त्यांनी म्हटले की, “इंडियन स्टेट जम्मू-काश्मीर” म्हणजेच भारतीय राज्य जम्मू काश्मीर. यावरून लक्षात येतं की, पाकिस्तानने मान्य केलं आहे की, जे दुनिया दीर्घकाळापासून मानत आहे. परंतु आतापर्यंत पाकिस्तानने मात्र हे मान्य करण्यास नकार दिला होता.
नंतर झाली चुकीची जाणीव तर लावले आरोप
यानंतर कुरेशी यांनी भारतावर आरोप केले की, “भारत जगाला हे दाखवू इच्छित आहे की, काश्मीरमध्ये स्थिती आता सामान्य झाली आहे परंतु असे अजिबात नाही. भारताला वर्तमानातील स्थिती बदलायची आहे.”
#WATCH: Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi mentions Kashmir as “Indian State of Jammu and Kashmir” in Geneva pic.twitter.com/kCc3VDzVuN
— ANI (@ANI) September 10, 2019
‘सीमेची सद्य स्थिती बदलण्याचा भारताचा कोणताच हेतू नाही’
परंतु या संदर्भात भारताने यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या चीन दौऱ्यादरम्यान म्हटलं होतं की, “भारत मातेच्या सीमेची सद्य स्थिती बदलण्याचा भारताचा कोणताच हेतू नाही.”