बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणूकीमध्ये शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले. आता यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची आगामी निवडणुकीसाठी राज्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्याचबरोबर डॉ. कोल्हे शिरुरचे खासदार झाल्यापासून त्यांनी भोसरीत अद्याप पाऊल टाकले नसल्याची तक्रार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती.
यांना उत्तर देत पवार म्हणाले की, डॉ. कोल्हे हे शिरुरपुरते मर्यादित नसून ते राज्याचा विचार करत आहे. त्यामुळे फक्त भोसरी-भोसरी करु नका. डॉ. कोल्हे हे फक्त भोसरी किंवा शिरुरपुरतेच मर्यादित नाही. त्यांना भोसरीमध्ये मते मिळाले नाही. त्यांना २८ हजाराची पिछाडी होती त्यामुळे त्यांना भोसरीत कसे यावेसे वाटेल, अशी उल्लेखनीय टिप्पनी त्यांनी केली.
पिंपळे गुरव येथील बैठकीत पवार यांनी कार्यकत्यांना डॉ. कोल्हे यांच्या कामाच्या शैलीमुळे चांगलेच सुनावले. ते कार्यकत्यांना म्हणाले की, आमदार किंवा खासदाराने घरोघरी हिंडायचे असते का ? किंवा पानटपरीवर गप्पा गोष्टी करायच्या असतात का ? कोल्हे हे खासदार म्हणून चांगले काम करत आहे. पुढे पवार म्हणाले की, डॉ. कोल्हे यांनी संसदेत शेतकऱ्यांचे आणि बैलगाड्यांचे प्रश्न मांडले. त्यांच्या या प्रवाभी वक्तव्याचे पंतप्रधानांनी कौतुकही केले. त्यांना भविष्यात निवडणूकीच्या काळामध्ये शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्यासोबत राज्यभर फिरायचे आहे.