पुणे बहुजननामा ऑनलाइन : अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या प्रश्नाने त्यांचे नातू रोहित पवार हे चांगलेच भडकले आहे. रोहित पवार म्हणाले कि, ‘राष्ट्रवादीच्या विरोधकांचं दोन्हीबाजूने वाजणाऱ्या ढोलकीसारखं झालं आहे. गरज पडली कि, बारामतीत यायचं, साहेबांचं कौतुक करायचं, प्रत्येक वेळी साहेबांचे सल्ले घ्यायचे आणि निवडणूक आल्या कि, म्हणायचे पवारांनी सत्त्तेत काय केले ?त्यामुळे आता बस्स झालं .. ‘ अश्या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केले आहे.
फेसबुकवर पोस्ट टाकत रोहित पवार यांनी आपला राग व्यक्त केला आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये मोठी गळती सुरु आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप आणि शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. त्यात अजूनही अनेक लोक पक्षांतर करण्याच्या वाटेवर आहे. राष्ट्रवादीच्या या गळतीला भाजप – शिवसेना पवारांच्या इतक्या वर्षाच्या राजकारणाला दोष देत आहेत, त्यांच्या कामाबद्दल बोट उचलत असल्याने त्यांचे नातू रोहित भडकले आहेत.
रोहित यांनी पक्षांतर करणाऱ्यांवरदेखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, ‘स्वतःच्याच घरात आमदारकी, खासदारकी बाळगणारे सध्या कुंपण सोडून बाहेर उद्या मारत आहेत. जाड – भरड पीठ दुसऱ्या पक्षात गेलं असल्याने आता जमीन नांगरायची वेळ आहे.’ अश्या शब्दात त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांना धारेवर धरत पवारांच्या विरोधकांनाही चांगलेच उत्तर दिले आहे.
पवार साहेबांचं राजकारण असं निश्चितच नाही कि, कोणीही यावं आणि त्याच्यावर बोट उचलावं . गेल्या ५० वर्षाच्या पिढ्या याला साक्ष आहे. त्यांच्या राजकारणामुळे अनेकांनी शेतीतून चार पैसे कमावले, त्यांच्या मुलानं चांगलं शिक्षण घेऊन, नोकरी केली आणि आता त्यांचा नातू आयटी कंपनीत नोकरी करतोय. शेतीपासून आयटी पार्क असा तो प्रवास आहे महिलांना समान संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या , दीनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे ते नेहमी उभे राहिले आहेत. राजकीय दबावाला बळी न पडता वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचा, माणसे जोडण्याचा हा इतिहास साहेबांचा आहे, त्यामुळेच आज सामान्य जनता त्यांचा पाठीशी उभी आहे , ‘ असं रोहित यांनी म्हटलंय.