मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारताच्या शेजारील देश अफगाणिस्तानात २८ सप्टेंबरला राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानात उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अमरुल्लाह सालेह यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेशी पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला आहे. सलेह म्हणाले की, अफगाणिस्तानकडे या गोष्टीचा पुरावा आहे की, पाकिस्तान इसिसच्या अतिरेक्यांना फंडिंग करत. अफगाणिस्तानमधील अंतर्गत प्रकरणाचे (गृहमंत्री) आणि गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख अमरउल्लाह सलेह यांनी एका वृत्तसंस्थेत दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. त्यांनी दावा केला की, नुकताच काबुलमध्ये इसिसच्या काही कार्यकर्त्यांना सुरक्षा दलाने पकडले. चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केले की त्यांना पाकिस्तानकडून निधी मिळतो. दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानने त्यांना शस्त्रेही पुरविली होती. आमच्याकडेही यासंबंधी ठाम पुरावे आहेत.
भारताने मात केलेला पाकिस्तान अफगाणिस्तान कडून घेतोय बदला
सलेहने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारचे समर्थन केले. त्याचबरोबर त्यांनी भारतावर खुन्नस खाणाऱ्या पाकिस्तानवर अफगाणीकडून बदला घेण्याचा आरोप देखील लावला, कारण अफगाणिस्तान भारताला मित्र मानतो.
काश्मीर भारताचे अंतर्गत प्रकरण-
पाकिस्तानकडून होणाऱ्या आतंकवादी घटना रोखण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलत जम्मू-काश्मीरमध्ये आर्टिकल ३७० हटवले. यावर सलेह यांनी अफगाणिस्तानचा दृष्टिकोन स्पष्ट केला. सलेह म्हणाले की, ‘हमारे विचार से भारत एक देश है और जम्मू-कश्मीर उसके क्षेत्र में आता है. ऐसे में जम्मू-कश्मीर से आर्टिकल ३७० हटाने का कदम भारत का आंतरिक मामला है. हमें नहीं लगता कि ये कोई ऐसा मामला है, जिसपर पाकिस्तान को मुद्दा बनाना चाहिए. साथ ही इसे अंतरराष्ट्रीय मंच पर भी नहीं ले जाना चाहिए.’
तालिबान सक्रिय राजकारणात कधीही येऊ शकत नाही-
तालिबान अफगाणिस्तानच्या सक्रिय राजकारणाचा हिस्सा होऊ शकतो का असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, पाकिस्तानने बऱ्याच आधी मुख्यधारेच्या राजकारणात येण्याची ऑफर त्यांना दिली होती, परंतू त्यांनी त्याला नकार दिला आणि दहशतवादाचा रस्ता सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. असे यामुळे की तालिबानला माहिती आहे की दहशतवादी निवडणूक लढू शकत नाही आणि कोणतेही जागा जिंकू शकता नाही. त्यामुळे तालिबान सक्रिया राजकारणात येणे अवघड आहे.
ते म्हणाले की, पाकिस्तान जम्मू काश्मीरचा मुद्दा अफगाणिस्तानशी जोडत आहे. त्याला आमचा विरोध आहे. भारताला घाबरलेला पाक अफगाणिस्तानचा बदला घेत आहे. हे अमानवीय आहे, यालाच दहशतवाद म्ह्णतात. भारताच्या अंतर्गत राजकारणाचा प्रश्न आहे, तर मोदी सरकारवर हे निर्भर आहे की ते काश्मीरसंबंधित काय भूमिका घेतात.
मोदी अफगाणिस्तानचे मित्र-
त्यांनी भारताच्या पंतप्रधान मोदींची स्तूती देखील केली, सलेह म्हणाले की, अफगाणिस्तान पंतप्रधान मोदींना ना की फक्त चांगला मित्र मानत तर दहशतवादाविरोधात उचललेल्या ठोस भूमिकेचे समर्थन करतो.
सलेह म्हणाले की जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करुन मोदी सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तान त्यांना चांगला मित्र मानतो. आमचा हाच संदेश आहे की मोदी अफगाणिस्तानशी अधिक जोडले जावेत. भारत अफगाणिस्तानमधील मैत्री अजून मजबूत व्हावी. मोदी अफगाणिस्तान आणि भारत यांमधील एक मजबूत स्तंभ आहे.