मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला हाणला की, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना वाईट असणारे लोक भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ कसे ठरतात ?, त्यासाठी कोणती वॉशिंग पावडर वापरली जाते ?, भाजपनं त्या पावडरचं नाव सांगावं.’
आजपासून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रेला सुरवात केली आहे. संवाद यात्रेनिमित्त सुळे आज नगरमध्ये होत्या. तिथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भाजपच्या पळवापळवीच्या राजकारणावर टिका केली. ‘आमचे बरेच लोक तिकडे गेले असल्यानं सत्ता कोणाचीही आली तरी आमचे लोकच सत्तेत असतील, असं त्या म्हणाल्या.
वाढती बेरोगजारी व आर्थिक मंदीमुळं सर्वसामान्य माणूस भरडला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘देशात ११ राज्ये अशी आहेत, जिथं बाहेरच्या व्यक्तीला जमीन विकत घेता येत नाही. इतकंच काय, मोदी सरकारने नागालँडसाठी स्वतंत्र घटना करण्यास मान्यता दिली आहे, ३७० कलम हटवण्याच्या पद्धतीला आमचा विरोध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. असा खळबळजनक दावाही सुळे यांनी केला.