मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यास सरकारी यंत्रणा नापास झाली आहे. सरकार त्यांचे अपयश लपवण्यासाठी कोणाशीही युती करायला तयार आहे. आता त्यांनी मांत्रिकाशी युती केल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. ५०० पेक्षा अधिक बालमृत्यू आणि १५० हुन अधिक महिलांचे गर्भपात झाल्याचे सरकारी अहवालातून निरक्षणासआले. जनतेच्या आरोग्यावर सरकार चे लक्ष नसून ते इतर गोष्टीवरच जास्त लक्ष केंद्रीत करते. असा आरोप मुंडे यांनी केला.
आता बारामती जिंकण्याच्या वल्गना करत आहेत. त्यांच्या या स्वप्नांचा फुगा मतदार फोडल्याशिवाय राहणार नाहीत असे मुंडे म्हणाले. चार राज्यात भाजपला फटका बसल्यानंतरही मुख्यमंत्री स्वप्नरंजनातून बाहेर निघण्यास तयार नाहीत. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.