बहुजननामा ऑनलाईन – ईडीने चौकशीसाठी राज ठाकरे यांना बोलावल्याने लोकांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. फक्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये ही अस्वस्थता नसून संपूर्ण समाजामध्ये ही अस्वस्थता आहे. यामागील कारण म्हणजे ठाकरे म्हटलं की मराठी माणसाची अस्मिता हे त्यांचे विरोधकही मान्य करतील.
या देशातील जनता अशा या सूडाच्या राजकारणाला सहन नाही करत. असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कोहिनुर मिलप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. साधारणतः सकाळी साडेअकरा वाजल्यापासून राज ठाकरे यांची चौकशी सुरु आहे. आता ही चौकशी काही तास सुरूच राहणार आहे.
यावेळी सुप्रिया सुळेंनीही टीका केली. यावेळी ते म्हणाले, ”बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार अजूनही जिवंत आहेत, यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली आहे.”