मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसीला देशातील अनेक राज्यात विरोध होत असून आंदोलने सुरू आहेत. या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष सतत प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, इतकी वर्षे देशात राहील्यानंतर लोकांना नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितले जात आहे, जे चुकीचे आहे. याच मुद्द्यावरून आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
#WATCH Jitendra Awhad,NCP in Thane:Main Delhi ke takht se poochta hoon,ab tu maangega mujhse saboot mere deshvasi hone ka?Toh sun,jab tera baap sar jhukakar angrezon ke talwe chaat raha tha,tab mera baap phansi ke takht ko choomke inquilab zindabad ke naare laga raha tha.(18.01) pic.twitter.com/WOwKP167xQ
— ANI (@ANI) January 20, 2020
एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी दिल्लीच्या सत्तेला विचारतो की, मी या देशाचा नागरिक असल्याचे पुरावे आता तू माझ्याकडे मागणार का ? तर ऐक…जेव्हा तुझा बाप मान वाकवून इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा माझा बाप फाशीवर चढताना इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा देत होता, असे आव्हाड म्हणाले. सीएए आणि एनआरसीला आगामी काळात राष्ट्रवादी जोरदार विरोध करून आक्रमक भूमिका घेणार असल्याचे आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून दिसून येत आहे.
दरम्यान, दिल्लीसह देशातील अनेक राज्यात एनआरसी आणि नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. दिल्लीच्या शाहीन बागमध्ये शेकडो महिलांनी धरणे धरले आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायदा मागे घेण्याची मागणी या महिला करत आहेत. शाहीन बागमधील महिलांचे हे आंदोलन देशातच नव्हे तर अंतराष्ट्रीय पातळीवरही चर्चेत आहे. त्याच प्रमाणे लखनऊ आणि पटणामध्ये सुद्धा आंदोलनाचा जोर वाढत आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या कायद्याला कडाडून विरोध करत आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, एनआरसी आल्यानंतर एका विशेष समाजाचे नागरिकत्व धोक्यात येऊ शकते. परंतु, सरकारचे म्हणणे आहे की नागरिकत्व दुरूस्ती कायदा पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यक नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. या कायद्याशी देशातील नागरिकांचा काहीही संबंध नाही. सध्या सीएएचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहचला आहे.
Visit : bahujannama.com