मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकतेच राष्ट्रवादीचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही आंबेडकर यांच्यावर पलटवार केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘वंचित’ चे ४८ खासदार निवडून येतील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पण प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही ते स्वत:च निवडणुकीत दोनही जागांवर पराभूत झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आमचे आमदार का असतील,’ असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रकाश आंबेडकरांना उत्तर दिलं आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे १० आमदार संपर्कात आहेत, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिली आहे. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगत आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या लाखोंच्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा फटका बसला होता. तीच नीती येणाऱ्या विधानसभेतही वापरली तर महाआघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.