पाचगणी : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला जरी अपयश आले असले तरी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार हे मात्र आपला बालेकिल्ला शाबुत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. नुकतेच खा. उदयनराजे भोसले यांनी मतदार संघातील जनतेला त्यांनी एक आवाहन केले आहे कि, मी द्वेषाचे राजकारण कधीही करत नाही. त्यामुळे आपले वैचारिक मत घेऊनच सर्वांच्या सहकार्याने मतदारसंघांचा करूया विकास असे पाचगणी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात उदयनराजे बोलत होते.
पुढे बोलताना राजे म्हणाले कि, आपले प्रश्न अडचणी समजून घेण्यासाठी मतदारसंघात मी लोकसभेच्या अधिवेशनानंतर आमसभा घेणार आहे. त्यामुळे लोकांची कामे वेगाने मार्गी लावता येतील. धोम धरणातून पाचगणी शहराला पिण्याचे पाणी उचलण्याची योजना मार्गी लावण्याचे साकडे उदयनराजेंना घातले.लोकसभेच्या विजयानंतर उदयनराजे यांनी पाचगणी परिसरातील मतदारांचा आभार दौरा केला. यावेळी पाचगणी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात उदयनराजे बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, युवानेते विकास शिंदे, विठ्ठल बगाडे, सचिन भिलारे, उज्ज्वला महाडिक, अर्पणा कासुर्डे, माजी उपसभापती मदन भोसले, वाहिवाटदार चंद्रकांत भोसले, विठ्ठल गोळे, मिलिंद कासुर्डे, रुपेश बगाडे, मेहुल पुरोहित, नागनाथ भोसले आदींसह नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.