पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट (NCP Political Crisis) पडल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. अजित पवार (Ajit Pawar DyCM Oath) यांनी आज आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. बंडामध्ये शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या विश्वासू नेत्यांचाही समावेश असल्याने त्यांना मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत घडलेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर कारवाई करणार का? यावरही पवारांनी भाष्य केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अजित पवारांच्या बंडावर (Ajit Pawar Rebellion) कारवाई होणार का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, हा पक्षाच्या धोरणाचा निर्णय नाही, ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोक आहेत, ते बसतील आणि निर्णय घेतील. त्यामुळे बाकीचे नेते आहेत. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी बोलून निर्णय घेतील. मी पक्षप्रमुख म्हणून जनरल सेक्रटरी म्हणून सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची निवड केली आहे. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची नेमणूक केली आहे. माझं त्यांना सांगणं आहे, पक्षासाठी जी पावलं टाकली पाहिजे होती, ती त्यांनी टाकली नाही. त्यामुळे ज्यांनी जबाबदारी टाकली त्यांचा आता विश्वास राहिला नाही. त्यासाठी उचित कारवाई करावी, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल. पक्षाच्या चौकटीबाहेर गेले, चौकट घेऊन गेले, त्या प्रत्येकाचा निकाल घ्यावा लागेल. नऊ लोकांचा आणि प्रत्येकाचा निकाल घ्यावा लागणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
मी पंतप्रधानांचा आभारी आहे
अलीकडेच देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी पक्षाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष असल्याचे म्हटले. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला तसेच सिंचन विभागाबद्दल जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. मला आनंद आहे, आज ज्यांनी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनाच शपथ दिली. म्हणजे मोदींनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या आरोपातून या सर्वांना मुक्त केले, या बद्दल पंतप्रधानांचा मी आभारी आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
माझा एककलमी कार्यक्रम राहील
जो काही प्रकार घडला आहे याची मला चिंता नाही. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मी साताऱ्यात एक मेळावा घेणार आहे. त्यानंतर राज्यात जेवढ्या लोकांना भेटता येईल हीच माझी उद्यापासूनची निती असणार आहे. राष्ट्रवादी हा पक्ष नव्हता, आमचे काही मतभेद झाले. त्यामुळे पक्ष स्थापन केला. कुणी काहीही करो आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू असे शरद पवार म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा कधी दिला ते मला माहिती नव्हते. पक्षाचे नाव घेऊन कोणी काहीही भूमिका घेत असेत तर आम्ही भांडण करणार नाही. आम्ही लोकांसमोर जाऊ, असे शरद पवार म्हणाले.
ही गुगली नाही हा दरोडा आहे
आजची घडामोड म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी आहे का? त्यांनी टाकलेली गुगली आहे का? या प्रश्नावर बोलताना शरद पवारांनी सत्ताधारी भाजपला (BJP) टोला लगावला. ही गुगली नसून हा दरोडा आहे. कारण ही कोणती छोटी बाब नाही, असे पवार यांनी सांगितले.
माझा कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास
राजीनामा दिल्यानंतर उद्या विरोधी पक्षनेत्याच्या नेत्याची नियुक्ती करायची असेल तर पक्ष प्रमुख म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, तो काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना (Thackeray Shiv Sena) यांचा असू शकतो, असे ते म्हणाले. राज्यातील कार्यकर्त्यांवर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यांची अस्वस्थता झाली असणार. आम्हाला निवडून देतात, आम्ही सांगू ती भूमिका मांडतात. ते अस्वस्थ होणार, त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटना बांधावी लागणार आहे. ते मी आणि तरुण कार्यकर्ते करु, असे पवार यांनी सांगितले.
आजचा प्रकार माझ्यासाठी नवा नाही
6 जुलै रोजी पक्षाची बैठक बोलावली होती. मात्र त्या आधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली, हे लवकरच समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते, तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. त्यावेळी ज्यांनी पक्ष सोडला, त्यापैकी 3 ते 4 सोडले तर सर्वजण पराभूत झाले. माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
शरद पवारांचा आमदारांना इशारा
आमच्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली आहे. आम्हीच पक्ष आहोत, ही त्यांची भूमिका आहे.
पक्षातील विधिमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली आहे, याचे चित्र आणखी दोन-तीन दिवसांत समोर येईल.
कारण ज्यांची नावे आली आहेत. त्यापैकी काही जणांनी माझ्याशी संपर्क साधला.
काही लोकांनी मला सांगितलं की, आम्हाला निमंत्रित करण्यात आले, आम्ही सह्या केल्या आहेत.
मात्र, आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे. याबाबत मी आत्ताच बोलू इच्छित नाही.
कारण, जनतेसमोर स्वच्छ चित्र मांडण्याची गरज आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी ते चित्र जनतेसमोर मांडावे
अन्यथा त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असा निष्कर्ष मी काढेन, असा इशारा शरद पवार यांनी आमदारांना दिला आहे.
त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा परत माघारी परतणार का, याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे.
Web Title : NCP Chief Sharad Pawar | sharad pawar pc on maharashtra politics will
action be taken against 9 people including ajit pawar