नांदेड : बहुजननामा ऑनलाईन- भाव वाढले म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होता, म्हणून यांना तेव्हा पोटशूळ उठला होता असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. शरद पवार सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेच्या तोंडावर अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षात सामील झाले. यानंतर आता कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी आणि त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत. सध्या ते राज्याचा दौरा करत आहेत. बीडनंतर ते आता नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते बोलत होते.
शेतकरी आणि कांद्याच्या भावावरून भाजपवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले, “आमच्या काळात जगात सर्वाधिक कृषी मालाची निर्यात करणारा देश भारत झाला होता. मी कृषीमंत्री असताना कांद्यांचे भाव वाढले म्हणून भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले होते. भाव वाढले म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होतो, म्हणून यांना पोटशूळ उठला होता.” अशी टीका त्यांनी केली.
‘दिल्ली यांची, मुंबई पण यांची अन् सर्वाधिक टीका मात्र माझ्यावर’
शरद पवारांवर होणाऱ्या टीकेनंतर भाजपवर पलटवार करत पवार म्हणाले की, “लाखांचा पोशिंदा संकटात आहे. 65 % लोक शेती करतात पण कर्जबाजारी झाले आहेत. यंदा 16 हजार शेतकऱ्यांनी आतम्हत्या केली. रिझर्व्ह बँकेने 3 आठवड्यांपूर्वी आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगितलं आहे. दिल्लीपासून सगळीकडे यांची सत्ता आहे, मात्र ते माझ्यावर टीका करतात.” असे पवारांनी स्पष्ट केले.
Visit : bahujannama.com