अबब….अशोक चव्हाण यांचा ४५ हजार मतांनी पराभव
नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – Exit poll काही असो विजयाच्या अगोदर तिन्ही मुख्य उमेदवारांची जय्यत तयारी? नांदेड मध्ये दिसू लागली होती.सोसिल मीडिया फेसबुक वर आमचा नेता जिकणार असे अशोक चव्हाण फॅन चे पोस्ट एका पाठोपाठ दिसू लागले पण दुपारी १२ नंतर त्या अशोक पर्वाचा मागे टाकून चिखलीकर आघाडी घेतली व तेवढ्याच आघाडीने विजय मिळवला. नांदेड मध्ये चुरस झाली असली तर विजयाचा खरा शिल्पकार कोण असणार ह्यासाठी सर्वांचे लक्ष वेधून होती. अशोक चव्हाण मागील निवडणूकीत मोदी लाटेतही कॉंग्रेसचा गड राखण्यात यशस्वी झाले होते. परंतु यावेळी मतदार राजाच्या मनात काय होतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सतराव्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या सात टप्यातील प्रदीर्घ निवडणुकीचे निकाल २३ मे २०१९ रोजी लागले आहेत.
नांदेड जिल्ह्यात वारे अशोक चव्हाण यांच्या बाजूने वाहीले असे चित्र दिसत काही काळ दिसत असले तरी काही ठिकाणी काँग्रेसला धक्का सहन करावा लागेल असे exit poll मधून दिसत होते. काही वृत्त वाहिन्यांनी अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात सर्व्ह केले असता १००℅ चिखलीकर खासदार होणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते पण अशोक चव्हाण यांनी हा exit poll खोटा आहे असे प्रतिउत्तर त्या वेळी दिले होते.नांदेडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भाजपच्या चिखलीकरांना बळ देणारी ठरली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल तीन सभा घेतल्या.
त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांना लोकसभेची संधी मिळेल का ? अशी चर्चा होती पण अशोक चव्हाण या बड्या व्यक्तीला नापसंदी जनतेने दाखवली व भाजप मध्ये नव्याने उभा असलेले उमेदवार प्रताप पाटील यांना नांदेड जिल्ह्यात खासदार म्हणून निवडून दिल्याने काँग्रेस हायकमांड वर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले .काही मतदार संघात काँग्रेसच्या दिगग्ज नेत्याचा दारुण पराभव झाला असल्याने अशोक चव्हाण देखील त्या पराभवाच्या बड्या नेत्याच्या यादीत आले असल्याची चर्चा जोर धरली आहे.
नांदेड मधून अशोक चव्हाण यांचा पराभव होणार नाही म्हणून दिल्ली हायकमांड काँग्रेस यांनी अशोक चव्हाण यांच्या नावाचा शिक्का मुहुर्त केला व त्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना संपूर्ण परिवाराची प्रचाराची ताकत लावून देखील त्यांचा आज पराभव झाला.विधानसभा साठी अशोक चव्हाण यांची तयारी सुरू राहणार असल्याची चर्चा सुरू आहे