मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निकालात देशभरात पुन्हा एकदा मोदींची लाट आली असून महाराष्ट्रा प्रमाणे देशातील इतरभागांमध्ये देखील भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येत आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता प्रस्तापित होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
दरम्यान, भाजपच्या या विजयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी भाजपच्या या प्रचंड मोठ्या विजयाला आकलन करता न येण्यासारखे आहे. असे म्हंटले आहे. ‘अनाकलनीय’ या एका शब्दात त्यांनी भाजपच्या विजयाविषयी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक काळात भाजपवर सडकून टीका केली होती. नुसतीच टीका केली नसून, राज यांनी सत्ताधाऱ्यांवर जे आरोप केले होते. ते व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यानिशी सादर देखील केले होते.त्यांचा ‘लाव रे तो व्हिडीओ ‘ मुळे विरोधकांनी चांगलाच धसका घेतला होता परंतु त्याचा प्रत्यक्ष परिणाम मतांच्या मार्फत दिसला नाही. त्यामुळॆ राज ठाकरे यांनी निकालावर अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
अनाकलनीय !#Verdict2019
— Raj Thackeray (@RajThackeray) May 23, 2019