मुंबई : बहुजनामा ऑनलाईन – राज्यातील काही ठिकाणी गेल्या शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे आणि मुंबईला तर २ दिवसापूर्वीच हाय अलर्ट दिला आहे. या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. तर हार्बर व पश्चिम रेल्वेही उशिराने सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. तसेच मुंबईकरांना काही काम नसेल तर त्यांनी घराबाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान ढगांच्या गडगडाटासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तर गेल्या ८ दिवसपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यातच ठाणे, रायगड आणि नाशिक पट्ट्यात आजही पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना मोठा पूर आला आहे. तसेच अनेक गावेच्या गावे पाण्याखाली गेल्याने हवामान खात्याने येत्या २४ तासात हाय अलर्टचा इशारा देऊन सतर्क राहण्यास सांगितले आहे.
- ‘या’ ७ वनौषधी करतील मेंदूला ‘तल्लख’, जाणून घ्या कसे करायचे उपाय
- स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या ? मेंदूशी संबंधित १० आश्चर्यकारक गोष्टी
- पोटाच्या ३ मिनिटांच्या ‘या’ मालिशने होतात ‘हे’ ८ चमत्कारी फायदे
- सावधान ! ‘या’ रोगांमुळे होऊ शकतो २४ तासांत मृत्यू, जाणून घ्या लक्षणे
- पहिल्या वेळेस सेक्स करत असाल तर घ्या ‘ही’ काळजी
- ताक प्यायल्याने होतात ‘हे’ ११ चमत्कारी फायदे, जाणून घ्या
- पाय करा, दूर होतील विविध आजार, जाणून घ्या