लखनऊ : वृत्तसंस्था – आजकाल फसवून लग्न करण्याचा नवीन ट्रेंड आलाय, पैशांसाठी जणू दोन -चार वेळा लग्न केलं जात आहे. अशीच एक घटना आहे बरेली मधील आमशाह गावातील. येथील छेदालाल नावाच्या व्यक्तीची पहिली बायको नीरजा हीचा ४ वर्षांआधीच मृत्यू झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी त्याने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. गावातच राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना त्याच्या भावाची भेट करुन दिली. त्याने आपली मेहुणी आणि तिचा नवरा या जगात नसल्याचे सांगून त्यांची मुलगी प्रियांका माझ्यासोबत राहते असे सांगितले आणि तिचा विवाह छेदालाल यांच्याशी करुन देतो असे सांगितले.
लग्नाच्या खर्चाची रक्कम म्हणजेच ३८ हजार रुपये त्यांनी घेतले. २५ मे रोजी त्याने प्रियांकाचे लग्न लावून दिले. त्यानंतर दोन महिन्यात त्या व्यक्तीने छेदालालशी संपर्क साधून आपल्या पत्नीची तब्येत खराब आहे. तिची काळजी घेण्यासाठी प्रियांकाला घरी घेऊन येण्यास सांगितले.
छेदालाल ने प्रियांकाला त्यांच्या घरी नेहून सोडले. खूप दिवसांनंतर देखील प्रियांकासोबत संपर्क होत नसल्याने, त्याने फोन केल्यावर नंबर बंद असल्याने तो बरेलीला आला. आणि पाहतो तर काय ? ती व्यक्ती तिथे भाडेकरू म्हणून राहत होती, आणि ते घर सोडून पळून गेले असल्याचे त्याला समजले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच हाफिजगंज पोलीस स्टेशन मध्ये घडलेली घटना सांगून तक्रार दाखल केली. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
- ‘या’ ७ वनौषधी करतील मेंदूला ‘तल्लख’, जाणून घ्या कसे करायचे उपाय
- स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या ? मेंदूशी संबंधित १० आश्चर्यकारक गोष्टी
- पोटाच्या ३ मिनिटांच्या ‘या’ मालिशने होतात ‘हे’ ८ चमत्कारी फायदे
- सावधान ! ‘या’ रोगांमुळे होऊ शकतो २४ तासांत मृत्यू, जाणून घ्या लक्षणे
- पहिल्या वेळेस सेक्स करत असाल तर घ्या ‘ही’ काळजी
- ताक प्यायल्याने होतात ‘हे’ ११ चमत्कारी फायदे, जाणून घ्या
- पाय करा, दूर होतील विविध आजार, जाणून घ्या