मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ओबीसींची जनगणना करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानपरिषदेत केली आहे. भारताला महासत्ता होण्यासाठी सर्व कष्टकरी व अंग मेहनीची कामे करणाऱ्या समाजाचा विकास होणे गरजेचे आहे.
लोकसंख्येत निम्म्यापेक्षा जास्त असलेल्या इतर मागास वर्गीय (ओबीसी) समाजाला विकासापासून वंचित ठेवून विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे राज्यातील ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी गजभिये यांनी केली.
यावेळी ते म्हणाले की की, हातात नानाविध कौशल्ये आणि अंगमेहनतीची तयारी असलेला हा समाज तीन हजार ७४३ जातीत विभागला आहे. त्यांची जनगणना केली तर त्याद्वारे ओबीसींचे शिक्षण, आरोग्य, गरिबी, रोजगार, निवारा याविषयीची माहिती जमा करता येईल. त्यातून ओबीसींच्या समकालीन जीवनमानाचे स्वरूप समजू शकेल. त्या माहितीच्या आधारे ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आणि धोरणे आखता येतील. व त्यासाठी अर्थिक तरतुद देखील करता येईल.