मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभेच्या तोंडावर राजकीय नेते एकमेकांवर जोराची टीका टिपण्णी करताना दिसू लागले आहेत .राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे ताकद असेल, हिंमत असेल तर पुढची विधानसभा निवडणूक जुन्या पद्धतीने बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी.
म्हणजे महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे हे तुम्हाला कळेल, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी म्हंटले आहे कि,या सरकारला माझे आव्हान आहे, बॅलेट पेपरवर एकदा निवडणूक घेऊन दाखवावी. या सभागृहाचा ठराव करा आणि निवडणूक आयोगाला येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची विनंती करा.
त्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तर पलीकडचे राधाकृष्ण विखे-पाटीलही आमच्याकडे येऊन बसतील. कारण त्यांना ईव्हीएमचे प्रताप काय आहेत हे माहिती आहे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.