मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनने राज्यात सुरक्षा रक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या ठिकाणी तब्बल सात हजार पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनच्यार अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2020 असून वयोमर्यादा 18 तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे. उमेदवाराला 12 वी मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
असा करावा अर्ज
MSSC च्या अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करता येतील
mahasecurity.gov.in या संकेत स्थळावर गेल्यानंतर Recruitment च्या लिंकवर क्लिक करा.
नव्या पेजवर Apply online for post of security Guard या पर्यायावर क्लिक करा.
अॅप्लिकेशन फॉर्मचं पेज उघडल्यानतर त्या ठिकाणी विचारलेला तपशील भरा.
अर्ज केल्यानंतर तुम्हाला Application ID प्राप्त होईल. हा Application ID सर्व प्रक्रियेसाठी महत्त्वाचा असलेल्याने तो काळजीपूर्वक जपून ठेवावा.
शुल्क भरल्यानंतर आपले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा.
भरतीचे शुल्क दोन पद्धतीने भरता येणार आहे –
1) ऑनलाईन पेमेंट
2) बँक ट्रान्सफर पेमेंट