बहुजननामा ऑनलाईन टीम – “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना राहिली नाही. शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिकता राहिलेली नाही. महापालिकेतही टक्केवारी घेऊन कामे होत आहेत. पैशाच्या जोरावर लोक आमदार महापौर, नगरसेवक होत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा वाघ राहिला नसून त्याच्या शेळ्यामेंढ्या झाल्या आहेत.” अशी घणाघाती टिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. तर त्यांच्या भाजपच्या प्रवेशासाठी शिवसेनाच आडकाठी आणत आहेत. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
नुकताच पुण्यात सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. या फेस्टिव्हलमध्ये ‘युवर्स ट्रुली नारायण राणे’ कार्यक्रमात ते बोलत होते. नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात त्यांनी राणे यांनी राजकारणातील प्रवेश, शिवसेनेशी संबंध, राजकारणातील प्रवेश, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेली भेटी यांसह त्यांच्या मुख्यंमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
राणे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम केले. शिवसेनेत असताना आम्ही जेवढी आंदोलने केली ती उद्धव ठाकरेंना माहितीही नसतील. मात्र आताची शिवसेना व्यवसायिक झाली आहे. शिवसेनेच्या मधल्या काळात मी सर्वाधिक लोकप्रिय होतो. मात्र उद्धव यांना चांगले दिसत नाही आणि चांगल्या व्यक्तीचे कौतुकही करता येत नाही. माझ्या कामाची पद्धत पाहून मनोहर जोशी आणि सुभाष देसाईनी माझ्याविरोधात कारस्थाने केली. उद्धव ठाकरेंचा अपवाद सोडल्यास सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध आहेत.”
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा