नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत सर्व पक्षाचे उमेदवार व नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी तेलंगणामध्ये प्रचारसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे हिटलर आहेत. तर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे हुकूमशहा आहेत.अशी टीका त्यांनी केली.
या ५ वर्षात देशात हुकूमशाही निर्माण झाली आहे. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल त्यांच्या मागे एडी व सीबीआय चौकशी लावली जात आहे. असा आरोपही गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. ते तेलंगणातील एका प्रचारसभेदरम्यान बोलत होते.
पुढे बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले कि भाजप सरकारच्या कार्यकाळात लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली तर त्याच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलं जात आहेत. सर्व देशवासीयांनी लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणण्याचे आवाहन आजाद यांनी तेलंगणातील जनतेला केले.