बीड : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने राज्यचे राजकीय चित्र बदलेले आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हे बीड मध्ये प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच शरद पवारांवर टीका करताना ते म्हणाले कि राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेऊ नका. निवडणुकांपूर्वी ते धर्मनिरपेक्ष असतात.पण निवडणुका झाल्यानंतर ते धर्मनिरपेक्ष नसतात. तर ते भाजपला पाठिंबा देतील. असे प्रकाश आंबेडकर म्हणले.
देशाची अर्थव्यवस्थाचा बट्याबोळ केला. बेरोजगारिचा दार वाढला युवकान नौकरीचे आमिष दाखऊन ते सत्तेत आले. तरीही लोकं म्हणतात मोदीला पर्याय नाही. भाजप सरकार बदलायचे असेल तर मोदींच्या विरोधातील पक्षाला निवडून दिले पाहिजे. राज्यात भाजपाचे सरकार बनलं नसत जर राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा जाहीर केला नसता.
तुम्ही चुकूनही राष्ट्रवादीला मतदान केले तर ते निवडणुकीनंतर भाजपाला पाठिम्बा देतील. पुढे प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधील उमेदवाराच्या सभेवेळी बोलताना मतदारांना आवाहन करताना म्हणाले कि एकीकडे आड तर दुसरीकडे विहिर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिले पाहिजे.