भंडारा : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात भाजप सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्य व गरीबाची गळचेपी केली. मोदीने दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करून देण्याचे अश्वशान दिले होते. पण त्याऐवजी भाजप सरकार उद्योगपतींचे धार्जिणे असून ते या देशाची लूट करीत आहेत. असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
भंडारा येथे राष्ट्रवादी-काँग्रेस व काँग्रेस मित्र पक्षच्या महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भुजबळ म्हणाले की भाजप सरकारच्या कार्यकाळात महागाईने सर्वच सीमा पार केल्या. बेरोजगारी मोट्या प्रमाणात वाढली. गरीबाच्या समस्या सुटण्याऐवजी त्या वाढतच गेल्या. उज्ज्वला योजने सर्व महिलांची निराशाच केली.
भाजप सरकारच्या या ५ वर्षाच्या काळात राफेलचा महाघोटाळा झाला.परत भाजप सरकारला पुन्हा निवडून दिल्यास स्वत:चीच फसवणूक होईल. नाना पंचबुद्धे यांचे हात बळकट करून राष्ट्राच्या सक्षम उभारणीत सहभाग व्हा. असे आवाहनही भुजबळ यांनी केले.
यावेळी सभेला माजी आमदार सेवक वाघाये.दामाजी खंडाईत.अविनाश ब्राम्हणकर.वृषाली खेडीकर. कृष्णा रोकडे. ज्ञानेश्वर राहांगडाले.आकाश कोरे.होमराज कापगते आदी मंडळी उपस्थित होते. तसेच भंडारा येथील सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर.माजी आमदार आनंदराव वंजारी. सुनील फुंडे. जिया पटेल.राजू कारेमोरे. महेंद्र गडकरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.