बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारने इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ५० पैशांवरून २ रुपये प्रतिलिटरपर्यंत इथेनॉलच्या वाढीव किमतीना मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय भारतीय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेच्या साठ्याची समस्या सोडविण्यासाठी आणि साखर कारखान्यांना शेतकर्यांची थकबाकी देण्यास मदत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर केल्यास कच्च्या तेलाची आयातही कमी होईल. या वेळी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी)मध्ये कोणतीही वाढ झाली नाही. या परिस्थितीत इथेनॉलच्या किंमती वाढवून कंपन्यांना व शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची इच्छा व्यक्त केली आहे.
इथॅनॉल हे मुख्यत: ऊसाच्या पिकापासून तयार केले जाते. इथॅनॉल हा अशा प्रकारचा पदार्थ आहे ज्यात पेट्रोल मिसळून त्याचा इंधन म्हणून वापर करता येईल. याचा फायदा शेती आणि पर्यावरणालाही होतो. भारतात उसाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इथॅनॉलचा वापर अक्षय्य ऊर्जा म्हणूनही करतो येतो. इथॅनॉल हे एका प्रकारचे इंधन आहे, वाहन चालविण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. पर्यायाने प्रदुषण कमी होऊन पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यासाठी इथॅनॉल वापरता येऊ शकते. घरगुती पद्धतीनेही इथॅनॉल बनविता येते. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी होण्यासही मदत होईल. तसेच ऊर्जा सुरक्षेत वाढ होऊन विना-विषारी, बायोडिग्रेडेबल तसेच देखभाल करण्यास सोपे, साठवणूकीसाठी आणि वाहतुकीसाठी सुरक्षित आहे.
इथेनॉलचे अनेक फायदे आहेत. इथॅनॉलमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण ३५ टक्के असते. इथेनॉलच्या वापरामुळे नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होते. याचा वापाराने कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जन ३५ टक्क्यांनी कमी होते. यामुळे कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर डाय ऑक्साईडचे उत्सर्जनही कमी होते. इथेनॉल आणि गैलोसीन च्या मिश्रणाचा वापर पेट्रोलचे इंजिन बदलण्यासाठी केला जातो. इथेनॉल हायड्रोकार्बन उत्सर्जन कमी करते. इथॅनॉल हे इंधन पर्यावरण पुरक आहे आणि जीवाश्म इंधनांच्या धोक्यांपासून पर्यावरणाचे रक्षण करते. घरगुती वापरासाठी ऊसापासून जैविक इंधन तयार केले जाते. कमी खर्चात अधिक ऑक्टन संख्या मिळते. एमटीबीईसारख्या घातक इंधनाला पर्याय म्हणून याचा वपर करता येतो. तसेच इंजिनमधील उष्णता कमी करण्यासही याचा वापर केला जातो.
इथॅनॉलचा वापर पहिल्यांदा ब्राझीलमध्ये सुमारे ४० वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. १९७९ पासून ब्राझिलियन वाहन कंपन्या दहा टक्के इथेनॉलने चालणार्या वाहनांची निर्मिती करीत आहेत. ब्राझील देश इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. येथे ऊसाच्या रसातून इथेनॉल तयार केले जाते. मागील वर्षी भारतातील इथेनॉल बाजारपेठेची उलाढाल सुमारे ११ हजार कोटी रुपये होती, जी यंदा २० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचविण्याचे लक्ष्य आहे.