बहुजननामा ऑनलाइन : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी बर्याच खास सेवा पुरवत असते, परंतु यासंदर्भातील माहिती फार कमी लोकांपर्यंत पोहचते. बऱ्याचदा आपण तिकीट बुक करतो परंतु काही कारणास्तव आपल्याला आपले प्लॅन पुढे ढकलावे लागतात, त्यामुळे बुक केलेल्या तिकिटाचे काय करायचे असं प्रश्न पडतो, तर आता चिंतेचे काहीच कारण नाही कारण भारतीय रेल्वे विभागाने सुरु केलेल्या या सुविधेमुळे तुम्ही तिकीट बुक केल्यानंतरही प्रवासाची तारीख बदलू शकता.
भारतीय रेल्वे सर्व प्रवाशांना तिकिटे आरक्षित करूनही प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. याबाबतची माहिती भारतीय पोर्टलवर उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ बुक कन्फर्मेशन, आरएसी (रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सोलेशन) आणि वेटिंग तिकिटावर मिळू शकेल. दरम्यान ही सुविधा केवळ ऑफलाइन बुक केलेल्या तिकिटांवर आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या माध्यमातून तिकिट बुकिंगनंतर प्रवासाची तारीख बदलवायची असेल तर ते शक्य होणार नाही.
स्टेशनवरून बुक केलेल्या तिकिटात, प्रवासाची तारीख एकदाच बदलली जाऊ शकते. तिकिट बुकिंगनंतर प्रवाशाला प्रवासाची तारीख पुढे ढकलण्यासाठी रेल्वे आरक्षण कार्यालयात तिकीट द्यावे लागेल. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हे काम आपण आपली ट्रेन सुटण्याच्या दोन दिवस आधी करावे. म्हणजेच बुक केलेल्या रेल्वेच्या तारखेच्या आधी आरक्षण कार्यालयाला भेट देणे गरजेचे आहे.
इतकेच नाही तर नियुक्त केलेल्या स्टेशनला तिकिट मिळाल्यानंतरही पुढील स्थानकांवर हा प्रवास वाढवता येतो. उदाहरणार्थ, एक प्रवासी जयपूरहून दिल्लीला येत आहे. ती ज्या ट्रेनमध्ये आहे, ती बनारस किंवा कानपूरलाही जाते. अशा परिस्थितीत ते दिल्लीचे तिकीट असूनही पुढे जाऊ शकतात. यासाठी प्रवाशाला स्टेशनवर पोचण्यापूर्वी किंवा तिकिट बुकिंगनंतर तिकीट तपासणी कर्मचार्यांशी संपर्क साधने गरजेचे आहे.