इस्लामाबाद : बहुजननामा ऑनलाइन – भारत सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यामुळे पाकिस्तान बिथरले, अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने अनेक टोकाचे निर्णय घेतले. काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. परंतु पाकिस्तानच्या हातात अपयशाशिवाय काहीच हाती लागले नाही. पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतासमोर गुडघे टेकवण्याची वेळ आली आहे. काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर पाकने भारतासोबतचे सर्व व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानचा हा माज फार काळ टिकला नाही. जीवनावश्यक औषधांची कमतरता जाणवू लागल्याने पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा असलेला हा माज चांगलाच उतरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने भारतात तयार झालेल्या जीवनावश्यक औषधांच्या आयतीला परवानगी दिली आहे.
पाक बऱ्याच गोष्टींसाठी भारतावर अवलंबून असतो. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारतात तयार झालेली औषधांची आयात करत असतो. पाकिस्तानला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधांसाठी तो भारतावर अवलंबून आहे. मिळालेल्या माहितीनुसार १६ महिन्यात पाकिस्तानने २५० कोटींपेक्षा जास्त फक्त रेबिज आणि अन्य औषधांची खरेदी भारताकडून केली आहे. परंतु काही दिवसांसाठी भारताबरोबर बंद केलेल्या व्यापाराला पाकिस्तानने परवानगी दिली आहे.
भारतात तयार झालेल्या औषधांच्या आयात आणि निर्यातीला पाकिस्तानच्या व्यापर मंत्रालयाने सोमवारी परवानगी दिली. यासंदर्भातील एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान , एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये औषधांचा तुटवडा होणार आहे. भारतातून येणारा कच्चा माल तसेच औषधांचा कधीही तुटवडा निर्माण होऊ शकतो. जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत आयातीमध्ये सवलती दिल्या पाहिजे असे EFPने म्हटले होते. आता पाकिस्तानकडे पर्याय नसल्यामुळे त्याने पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू केला आहे.