औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला व एमआयएम यांची आघाडी लोकसभेप्रमाणेच कायम ठेवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात झालेल्या बैठकित घेण्यात आला. सोमवारी दिल्लीत त्यांच्यात बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
लोकसभा निवडणूकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने सोबत निवडणूक लढविली होती. त्यानंतर औरंगाबादेत इम्तीयाज जलील यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करत विजय मिळवला. त्याप्रमाणे इतर मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांच्या आघाडीमुळे मताधिक्य वाढलेले आहे. लोकसभेतील वाढलेल्या मताधिक्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती आगामी निवडणूकीतही कायम राहावी. अशी चर्चा या बैठकित करण्यात आली.
त्यासोबतच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागावाटप आणि इतर बाबींवर चर्चा झाली. मागील विधानसभा निवडणूकीत एमआयएमने २४ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यानंतर आता यावर्षी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर येत्या आठवडाभरात दोन्ही पक्षांच्या जागांसंदर्भात यादी करण्यात य़ेणार आहे.