कोलकाता वृत्तसंस्था- झारखंड मध्ये ‘जय श्री राम’ न बोलल्यामुळे एकाला जीवानिशी जावे लागले होते आता हे लोन देशभरात पसरत आहे यावर नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशात्रज्ञ अमर्त्य सेन यांनी यावर भाष्य केले आहे. ‘जय श्री राम’ चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नसून आता लोकांना मारहाण करण्यासाठी या नाऱ्याचा वापर होत आहे असे अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. जाधवपूर विद्यापीठातील एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी याअगोदर बंगालमध्ये ‘जय श्री राम’चा नारा कधी ऐकलेला नाही. मात्र या नाऱ्याचा वापर आता लोकांना मारहाण करण्यासाठी केला जात आहे. अमर्त्य सेन यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे.‘जय श्री राम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही. आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. यापूर्वी याबद्दल कधी ऐकले नव्हते. मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझी आवडती देवता कुठली ? असा प्रश्न केला. त्यावर तिने माँ दुर्गा असे उत्तर दिले. माँ दुर्गा आपल्या आयुष्यात सर्वव्याप्त आहे असे अमर्त्य सेन म्हटले आहे.
माझ्या मते लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’ या नाऱ्याचा उपयोग केला जात आहे. देशाच्या काही भागांमध्ये लोकांवर जय श्री रामचा नारा देण्यासाठी सक्ती करण्यात आल्याचे प्रकार घडले असून नकार देणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर अमर्त्य सेन यांनी हे विधान केले आहे.
गरीबीवर भाष्य करताना त्यांनी म्हटले की , गरिबांच्या हातात उत्पन्न वाढल्यामुळे पैसे आले म्हणजे त्यांची दुर्दशा संपली असे होत नाही. मूलभूत सोयी -सुविधा जसे कि प्राथमिक आरोग्य सुविधा, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेने गरीबी कमी होईल असे सेन यांनी म्हटले आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.
Nobel laureate Amartya Sen in Kolkata: I haven't heard Jai Shri Ram earlier. It is now used to beat up people. I think it is has no association with Bengali culture. Nowadays, Ram Navami is celebrated more in Kolkata which I haven't heard earlier. (July 5) pic.twitter.com/s10MPWj9un
— ANI (@ANI) July 6, 2019