नवी दिल्ली, वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मोदी सरकारमधील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला या अर्थ संकल्पात महिलांना आधिक सक्षम करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करुन महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. यावर भर देण्यासाठी ‘नारी तु नारायणी’ ही योजना मोदी सरकारने आणली आहेत.यासंदर्भात एक समिती बनवण्यात येणार असून ती देशाच्या विकासात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत माहिलांचा वाटा वाढण्यासाठी काय करता येईल यावर सूचना करणार आहे.
या योजनाद्वारे महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न केला आहे. या योजनाच्या माध्यामातून महिला उद्योगामींना सरकार प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे.
अर्थ संकल्पात महिलांना कोणते आतिरिक्त लाभ दिले ?
बँकेत जनधन खाते असलेल्या महिलांना मोदी सरकारकडून ५००० रुपयांची ओवर ड्राफ्टची सुविधा देण्यात येईल.
स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या महिलांसाठी आणलेल्या योजनेत, मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येईल.
महिलांना उद्योग उभा करण्यात सरकार मदत करणार, त्यासाठी सरकारकडून महिलांकडून उद्योगाना प्रोत्साहन देणार.
सहायत्ता समूह सारख्या योजनेतून महिलांना मदत पुरवणार.