नागपूर : Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनात झालेला लाठीचार्ज हा बचावात्मक आणि वाजवी असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session) लेखी-प्रश्नोत्तरात सांगितले आहे. यावरून मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जालना जिल्ह्यातील या आंदोलनात हिंसक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत ७९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले आहेत. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने बळाचा वाजवी वापर केला. त्यात ५० आंदोलक जखमी झाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली आहे.
फडणवीस यांच्या या माहितीवरून जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले, तर पुढे काय काय होते, ते पाहा. तुमचा डाव उधळून लावणार आहे.
तरच, मराठ्याचे असल्याचे सांगणार.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी टीका केल्याने आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी
जरांगेंना इशारा दिला आहे. राणे यांनी म्हटले फडणवीसांवर टीका कराल, तर आम्ही सहन करणार नाही.
फडणवीसांविरोधात भूमिका घेण्यास सुरूवात कराल, तर गाठ मराठ्यांशी आहे.
नितेश राणे यांना प्रत्युत्तर करताना जरांगे यांनी म्हटले की, मराठ्यांनी सावध राहावे.
कारण, देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांविषयी गरळ ओकण्याचा अंदाज दिसतोय. बरेचशे नेते आता जागे होत आहेत.
मराठ्यांनाच मराठ्यांविरोधात अंगावर घालण्याचे काम चालू आहे. पण, किती जणांना अंगावर घालणार हे मी पाहतो.
आम्ही शांत आहोत आणि राहु द्या.