बिहार : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि ममता दीदी यांच्यातील कोल्ड वॉर मुळे सर्वात जास्त चर्चा पश्चिम बंगालची झाली. तसेच बंगाल मध्ये जय श्रीराम घोषणेचा वाद चांगलाच गाजला असून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. JDU च्या एका नेत्याने ममता दीदींवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान बनण्यापासून ममतादीदींनी रोखावे, असे आवाहन जेडीयू प्रवक्ते अजय आलोक यांनी केला आहे.
आलोक म्हणाले कि, पश्चिम बंगालमधून बिहारी लोकांना बाहेर काढले जात आहे.तेथे सातत्याने हत्या होत आहेत. या आधी भाजप कार्यकर्त्त्यांकडून ममता दीदी ह्या बंगाल हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरत असून त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून ममता दीदींनी पश्चिम बंगालला मिनी पाकिस्तान होण्यापासून रोखावे, असे आवाहन आलोक यांनी ममता बॅनर्जी यांना केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी बिहारच्या बाहेर जेडीयू आणि एनडीए आघाडी करणार नाहीत त्यामुळे ममता बॅनर्जींनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नित कुमार यांना अभिनंदन आणि धन्यवाद केले होते.