याकतपूर रोड औसा येथील श्री केशव बालाजी देवस्थानच्या धर्म व संस्कारनगरीत झालेल्या माहेश्वरी समाजाच्या एक दिवशीय अधिवेशनात मार्गदर्शन करताना सोनी बोलत होते. महेश पूजन आणि दीप प्रज्वलनाने या अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मंचावर संयोजक हुकूमचंद कलंत्री, महिला अध्यक्षा विभा गिल्डा, माहेश्वरीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पल्लोड, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, माहेश्वरीचे अखिल भारतीय प्रवक्ते रमेश परताणी, सभेचे जिल्हा सचिव सत्यनारायण हेड्डा, कोषाध्यक्ष फुलचंद काबरा, संघटनमंत्री ओमप्रकाश सारडा, युवा अध्यक्ष विशाल काबरा, प्रकाश कासट आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मारवाडी समाज संपूर्ण जगात आहे. मात्र, त्यांची लोकसंख्या अगदी नगण्य आहे, असे नमूद करून सोनी म्हणाले की, समाजाचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संघटन आहे. हे संघटन मजबूतही आहे. राष्ट्रीय स्तरावरची संस्था १०० वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे. सुसंस्कारीत समाज निर्माण व्हावा व समाजाचे प्रश्न सुटावेत, यासाठी या संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजामध्ये एक वर्ग प्रचंड श्रीमंत आहे तर दुसरा वर्ग दयनीय अवस्थेत आहे. त्यांना बळ देऊन आपल्यासोबत आणण्याची गरज आहे. घुंगट हटविण्यासाठी अडीच दशके संघर्ष करावा लागला. हे परिवर्तन उत्तम आहे. समाजातील १२ तरुणांनी विधवा मुलींशी विवाह करून सर्व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे सोनी यांनी सांगितले. समाजात पूर्वी एकत्रीत कुटुंब पद्धत होती. दुर्दैवाने अलिकडच्या काळात या पद्धतीचे विघटन झाले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत, असे नमूद करून रमेश परताणी यांनी एकत्रीत कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर आजी-आजोबांकडून उत्तम संस्कार होत होते.
त्यामुळे अजूनही समाजात एकत्रीत कुटुंब पद्धती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मधुसूदन गांधी यांनी मुलींचे २८ व्या वर्षी तर मुलाचे ३५ व्या वर्षी विवाह होत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम समाजाच्या लोकसंख्येवर होत आहे. संपूर्ण जगात समाजाची लोकसंख्या जेमतेम १० लाख असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी जिल्ह्यातील सर्व माहेश्वरी बंधू-भगिनींचे परिचयपत्राचे (बायोडेटा) संकलन करणे, गृहोद्योगाला चालना देऊन महिला भगिनींना स्वत:च्या पायावर उभे करणे, त्यांनी निर्माण केलेल्या मालांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. या उद्देशाने हे अधिवेशन घेण्यात आल्याचे सांगितले. यावेळी संयोजक हुकूमचंद कलंत्री यांनीही मनोगत व्यक्त केले. या अधिवेशनास जिल्ह्यातील १ हजार ९०० कुटुंबातून ४ हजार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. गोपाल बाहेती, अनिता मालू व महेश तोष्णीवाल यांनी केले.
याकतपूर रोड औसा येथील श्री केशव बालाजी देवस्थानच्या धर्म व संस्कारनगरीत झालेल्या माहेश्वरी समाजाच्या एक दिवशीय अधिवेशनात मार्गदर्शन करताना सोनी बोलत होते. महेश पूजन आणि दीप प्रज्वलनाने या अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मंचावर संयोजक हुकूमचंद कलंत्री, महिला अध्यक्षा विभा गिल्डा, माहेश्वरीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पल्लोड, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी, माहेश्वरीचे अखिल भारतीय प्रवक्ते रमेश परताणी, सभेचे जिल्हा सचिव सत्यनारायण हेड्डा, कोषाध्यक्ष फुलचंद काबरा, संघटनमंत्री ओमप्रकाश सारडा, युवा अध्यक्ष विशाल काबरा, प्रकाश कासट आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मारवाडी समाज संपूर्ण जगात आहे. मात्र, त्यांची लोकसंख्या अगदी नगण्य आहे, असे नमूद करून सोनी म्हणाले की, समाजाचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संघटन आहे. हे संघटन मजबूतही आहे. राष्ट्रीय स्तरावरची संस्था १०० वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे. सुसंस्कारीत समाज निर्माण व्हावा व समाजाचे प्रश्न सुटावेत, यासाठी या संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजामध्ये एक वर्ग प्रचंड श्रीमंत आहे तर दुसरा वर्ग दयनीय अवस्थेत आहे. त्यांना बळ देऊन आपल्यासोबत आणण्याची गरज आहे. घुंगट हटविण्यासाठी अडीच दशके संघर्ष करावा लागला. हे परिवर्तन उत्तम आहे. समाजातील १२ तरुणांनी विधवा मुलींशी विवाह करून सर्व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे सोनी यांनी सांगितले. समाजात पूर्वी एकत्रीत कुटुंब पद्धत होती. दुर्दैवाने अलिकडच्या काळात या पद्धतीचे विघटन झाले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत, असे नमूद करून रमेश परताणी यांनी एकत्रीत कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर आजी-आजोबांकडून उत्तम संस्कार होत होते.
त्यामुळे अजूनही समाजात एकत्रीत कुटुंब पद्धती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मधुसूदन गांधी यांनी मुलींचे २८ व्या वर्षी तर मुलाचे ३५ व्या वर्षी विवाह होत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम समाजाच्या लोकसंख्येवर होत आहे. संपूर्ण जगात समाजाची लोकसंख्या जेमतेम १० लाख असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी जिल्ह्यातील सर्व माहेश्वरी बंधू-भगिनींचे परिचयपत्राचे (बायोडेटा) संकलन करणे, गृहोद्योगाला चालना देऊन महिला भगिनींना स्वत:च्या पायावर उभे करणे, त्यांनी निर्माण केलेल्या मालांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. या उद्देशाने हे अधिवेशन घेण्यात आल्याचे सांगितले. यावेळी संयोजक हुकूमचंद कलंत्री यांनीही मनोगत व्यक्त केले. या अधिवेशनास जिल्ह्यातील १ हजार ९०० कुटुंबातून ४ हजार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. गोपाल बाहेती, अनिता मालू व महेश तोष्णीवाल यांनी केले.