वरळी : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीत महत्वाची असणाऱ्या वरळी मतदार संघात युवानेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश माने यांच्यात काटे कि टक्कर होती. तरी आपला बालेकिल्ला असणाऱ्या वरळी मतदार संघ शिवसेनेने पुन्हा राखला आहे. आदित्य ठाकरे हे पहिल्या फेरीपासूनच हजारो मतांनी आघाडीवर होते, त्यामुळे आधीपासूनच सुरेश माने यांचा पराभव होणार असल्याची चर्चा सुरु होती.
दरम्यान ठाकरे यांच्या घराण्यातील प्रत्यक्ष राजकारणात उतरणारी ही पहिली पिढी असल्याने ठाकरे घराण्याची ही महत्वाची निवडणूक होती. शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असणारा वरळी मतदार संघातून आदित्य यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे आपला गड राखत आदित्य ठाकरे यांनी ६७हजार ६७२ मतांनी बाजी मारली आहे.
Visit : bahujannama.com