मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहुर्त निश्चित झाला आहे. सत्तास्थापनेनंतर तब्बल महिनाभरानंतर येत्या ३० डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम दुपारी एक वाजता होणार आहे. परंतु शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत संपवावा अशी तोंडी सूचना राजभवननावरील राज्यपाल कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाला देण्यात आली आहे अशी चर्चा सुरु होती.
मात्र, शपथविधीच्या कार्यक्रमाबाबत राजभवनाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे. ३० डिसेंबराला होणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केली नसल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी ही माहिती पत्रकान्वये कळवली आहे.
मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, कोणते खाते मिळणार याची चर्चेने जोर धरला आहे. राज्यपालांच्या सूचनेनंतर त्याला उत्तर दिले जाईल. सरकार जी वेळ मागते तीच वेळ दिली जाते. मंत्रिमंडळ विस्तारातात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश असेल. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंची आता अग्निपरीक्षा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागणीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पेच निर्माण झाला आहे. सध्या सेनेकडे उद्योग खातं आहे. या खात्यासह उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं समजते. गृह खातं राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेस उपमुख्यमंत्रिपदाची मागणी करत असल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये खातेवाटप झाले होते. यामध्ये गृह खाते सध्या तरी शिवसेनेकडे आहे पण ते राष्ट्रवादीकडे देण्यात येणार आहे. तर काँग्रेसकडं महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण खाती आहेत. कमी आमदार असतानाही काँग्रेसला चांगली खाती देण्यात आली आहेत.
Visit : bahujannama.com