सातारा : बहुजननामा ऑनलाईन – महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी अंतिम शिक्कामोर्तब होत असताना रात्रीतून राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध बंद करत भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. त्यावर, अजित पवारांच्या या निर्णयाची कल्पना मला नव्हती, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच हकालपट्टीचा निर्णय पक्षाकडून घेतला जात असतो. हा निर्णय एक व्यक्ती घेत नाही, असंदेखील शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवार साताऱ्यातल्या प्रीतीसंगमावर आले असता पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले कि, एखाद्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करायची का, याचा निर्णय एक व्यक्ती घेत नाही, तर पक्ष घेईल. अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार असले तरी त्यांची निवड वैध आहे ? कारण भाजपकडे बहुमत नसतानाही त्यांनी सरकार स्थापन केलं आहे.
भाजपासोबत जाण्याच्या निर्णय हा अजित पवार यांचा स्वतःचाच आहे. पक्ष त्यांच्या सोबत नाही. तसेच अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी यावेळी भाजपवर निशाण साधला आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपती पदांच्या गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी भाजपवर केला. केंद्र सरकारकडून मनमानी कारभार सुरु आहे, असंदेखील शरद पवार म्हणाले.
Visit : bahujannama.com