मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महापूराने थैमान घातले आहे. आठवडाभराच्या हाहाकारात ४० जणांचे बळी गेले. महापूराचा फटका सर्वाधिक कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली आणि पुण्याला बसला आहे. त्यामुळे हजारो संसार उद्धवस्त झाले आहेत. अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
राज्यात पुराचा सर्वाधिक फटका कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, आणि पुणे जिल्ह्याला बसला आहे. नैसर्गिक संकटामुळे हजारो संसार उद्धवस्त झआले. तर लाखोंचं पशुधनही गेलं. शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. पाणी अजून ओसरले नाही. त्यामुळे नुकसानाचा अंदाज लागत नाही. हे पाणी आठ दिवसांनंतर पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. झालेल्या नुकसानाचा अंदाज घेतल्यानंतर तो आकडा पाहून हादरा बसेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तर कोल्हापूरात शिरोळ तालुका सर्वाधिक पूरग्रस्त आहे. या तालुक्यातील हसूर गाव कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर आहे. त्यामुळे गावात पाणी शिरल्याने गावाला बेटाचं स्वरुप आले आहे. गावातील उंच जागेवर नागरिक सुरक्षितपणे आहे. परंतु जनावरांनाही त्यांनी आपल्या सोबत नेले आङे.
गॅस आणि पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे. बचावकार्य संपल्यानंतर या टंचाईमुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. तर या भागात जाणारे मार्गच बंद झाल्याने या वस्तू पाठविणेही मुश्कील झाले आहे.