मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात विधानसभेचा निकाल लागूनही बराच काळ लोटून गेला तरी राज्यात सरकार स्थापन झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सर्वात जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यात भाजप अयशस्वी ठरले, असे वाटत आहे. मात्र नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होत. मात्र गडकरींच्या या विधानाचे प्रत्युत्तर देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात चांगलाच टोला लगावला आहे. ‘गडकरी आमचे मित्र आहेत पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसला नाही असा खोचक टोला थोरातांनी लगावला आहे.
थोरात पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना खूप उशीरा भेटले, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करावी म्हणून आधीच विनंती केली. त्याचबरोबर राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल आणि मंत्रिमंडळ वाटपासंदर्भात दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना नितीन गडकरी म्हणाले होते कि, क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. कधी -कधी आपण सामना गमावत आहोत, असं वाटू लागतं. मात्र त्यानंतर वेगळाच निकाल समोर येतो.’ त्याचबरोबर राज्यात कोणाचं सरकार येईल, याबद्दल मला कल्पना नसल्याचं देखील ते म्हणाले. तसेच बाळासाहेब थोरात यांनी आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला देखील सडेतोड उत्तर दिल आहे. राज्यात तीन अंकी नाट्याचा प्रयोग सुरु आहे अशी टीका आशिष शेलार यांनी महाशिवआघाडीवर केली होती. त्यावर तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही, म्हणून बोलत आहे असं प्रतिउत्तर थोरातांनी शेलारांना दिल आहे.
Visit : bahujannama.com