मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लांबणीवर पडलेला सत्तास्थापनेसाठी तिढा लवकरच सुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपला सत्तापासून दूर सारून शिवसेनेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मिळून नवीन समीकरण जुळवताना दिसत असून सरकार स्थापनच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने भाजपला सत्तेपासून बाजुला सारण्याचा खेळाला निवडणुकीपूर्वीच सुरुवात केली होती का, अश्या चर्चाना उधाण आले आहे.
२०१४ मध्ये विरोधात, नंतर सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेला मागील पाच वर्ष भाजपने मंत्रीपदांसाठी योग्य ती जागा दिली नाही. विधानसभेला ठरल्याप्रमाणे युतीसाठी चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बोलणी झाली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदासंर्भात काहीही बोलणं झालं नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर युती तुटली. मात्र, जागा वाटपात मिळतील तेवढ्या जागा घेऊन भाजपला अर्ध्यात आणायचं अशी योजना तर शिवसेनेची नव्हती ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. परंतु, भाजप १२२ हून १०५ वर आले. त्यामुळे अर्थातच युतीमुळे भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही. उद्धव यांनी युतीत मिळेल तेवढ्या जागा मिळवून एकप्रकारे भाजपला बहुमतापासून रोखल्याचे दिसते. त्यामुळे सेनेचा हा डाव यशस्वी झाला का ? असा प्रश्न भाजप नेत्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
Visit : bahujannama.com