मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्तास्थापनेबाबत चढाओढ सुरु आहे. सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग वाढला आहे. शिवसेना आपल्या मतावर असून बसली आहे. त्यात शिवसेना नेता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असं ठामपणे सांगत लवकरच उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
‘राज्यात स्थिर सरकार यावं ही सगळ्यांची भूमिका आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीची आणि शिवसेनेची भूमिका याबाबत राज्यपालांशी चर्चा झाली आहे. अपक्षांची भूमिका महत्वाची आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच शरद पवार देशाचे मोठे नेते, ते मुख्यमंत्री होतील ही अफवा आहे असंही त्यांनी सांगितले.
राजकारणात चर्चा होत असते. दिल्लीतलं आम्हाला माहित नाही, त्यांच्या पक्षातलं देखील काही माहित नाही. शिवसेनेने प्रस्ताव पाठविला नाही या शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेने वेट अँन्ड वॉच अशी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची माझं बोलणं झालं. शरद पवारांना भेटलो हा गुन्हा आहे का ? लवकरच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन महाराष्ट्रातील ग्रहण सुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, तरुण भारतच्या अग्रलेखावर राऊतांनी निशाणा साधत म्हंटले कि, टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच, मी माझ्या पक्षाची भूमिका समोर मांडतो, पक्षाच्या हक्कासाठी मी संघर्ष करतोय, दिलेला शब्द का पाळला जात नाही त्यावर कोणी बोलत नाही. जे सत्य आहे, कोण खोटं बोलतंय याची कल्पना सगळ्यांना आहे. न्याय आणि अधिकारासाठी सत्याची लढाई आहे. विजय आमचा होईल. महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री होईल जे पाहून जनता नक्कीच बोलेल महाराष्ट्राचा चेहरा बदलला आहे, असे संजय राऊत म्हणाले.