मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ‘आमच्या घरात सगळं आलबेल आहे, असं सांगायची वेळच का येते ? हे मला सांगा असे म्हणत भाजप नेते धस यांनी पवारांचा गृहकलह पुन्हा एकदा उकरून काढला आहे. पवारांच्या घरात काहीतरी चाललंय, आमकं – तमकं सुरु आहे. हे इकडे ते तिकडे लोकसभेत, कोण काय करतय, अश्या काहीतरी बातम्या सुरु होत्या, पण तरीसुद्धा आमच्या घरात गृहकलह काहीही नाही, असं अजित पवारांना सांगायची वेळ का येते ? काहीतरी असल्याशिवाय असं सांगायची वेळ का येते,’ हे मला म्हणायचे आहे. असे म्हणत धस यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोणालाही न सांगता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता, त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात आणि राज्यात गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या राजीनाम्यासंदर्भातील खुलासा केला होता. ‘इ माझी चूक आहे कि नाही मला माहित नाही, परंतु मी सर्वांची, कार्यकर्त्यांची माफी मागतो. असे अजित पवार म्हंटले, तसेच आमच्या घरात कोणताही गृहकलह नाही, असे त्यांनी स्पष्ठ केले.
जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सुरेश धस बोलत होते. दरम्यान जयदत्त क्षीरसागर हे बीड मतदार संघातून उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Visit : bahujannama.com