वैजापूर : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी फुंकली आहे, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनीदेखील मागे राहिले नाहीत, ‘ शरद पवार यांनी कधीही स्वस्थ बसू नये अशी आमची इच्छा आहे. शरद पवार यांना सरकार घालवण्याचा चांगलाच अनुभव आहे, स्वतःच्याच पक्षाच्या वसंतदादांच्या पाठीत वार करून स्वतः मुख्यमंत्री झाल्याचे घणाघात उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केला.
दरम्यान मी इथे फक्त बोलायला आलोलो नाही , मी इथे सरकार स्थापन करून काम करण्यासाठी आलो आहे. आम्हाला काही तरी द्यायचेय म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, मतदारसंघात असंख्य इच्छुक कार्यकर्ते पक्षाचे वैभव आहे. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. सर्वजण आपल्या इच्छा बाजूला ठेवत एकत्र काम करत आहेत. पक्ष जरी दोन असले तरी , विचार एक आहे आणि भगवा एक आहे. राज्यच नव्हे तर संपूर्ण देश आम्हाला भगवा करायचा आहे.
उद्धव यांनी आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका करत सांगितले कि, इथले प्रकल्प अजून मार्गी लागलेली नाही, बेकारांना भत्ता देऊ, तरुणांना भत्ता नको काम हवे आहे, मेहनत करणारा महाराष्ट्र आहे, आम्ही तरुणांना काम देऊ, उद्योगधंदे उपलब्ध करून देऊ, ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या उपलब्ध करून, त्यामुळे आपला माणूस आणि परका माणूस यांच्यात बराच फरक आहे,’ अश्या शब्दात त्यांनी टीका केली आहे. तसेच इतर पक्ष खाऊन खाऊन थकले आहेत, पण शिवसेना आणि मित्रपक्ष कधीच थकणार नाही, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून देऊ, त्यामुळे आम्हीच कधीच स्वस्त बसणार नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे, महाराष्ट्र तुमचा आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
Visit : bahujannama.com