मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – २१ ऑक्टोबर रोजी राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. त्याच विधानसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासांत लागणार आहे. निवडणुकीनंतर अनेक संस्थांनी आपल्या एक्झिस्ट पोलचे आकडे सादर केले. दरम्यान एक्झिस्ट पोलच्या अंदाजानुसार महायुती पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन करणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र निकालापूर्वी काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे.
वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेला जर जास्त जागा मिळाल्या तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात. राजकारणात कधीही काही होऊ शकते , त्यामुळे काहीही अशक्य नाही असा इशारा काँग्रेसने भाजपला दिला आहे. तसेच एक्झिस्ट पोलच्या आकड्यानुसार जर शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीने जर पाठिंबा दिला आणि त्यात काँग्रेसनेही जर बाहेरून पाठिंबा दर्शविला तर, आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात. आणि यामुळे ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल’ म्हणणारे घरी बसू शकतात. अर्थात त्यांच्या या विधानामुळे राजकारणात काहीही होऊ शकत आणि त्यातूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते.
परंतु जर एकट्या भाजपला बहुमत मिळालं तर शिवसेनेला सत्तेत कोणताही वाटा मिळणार नसल्याचं म्हंटले जात आहे. तरी उद्याचे निकाल लागल्यानंतर शिवसेना काय आहे ते कळेल, त्यामुळे कितीही पटलं नाही तरी इतर युती राहणार आहे. शिवसेना १०० जागांवर निवडून येईल. भाजपला जरी बहुमत मिळालं तरी शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही, असा दावा शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला. दरम्यान, एक्झिस्ट पोलनुसार शिवसेनेला १०० जागा मिळणार असल्याचं म्हंटल जात आहे. असं झाल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना सत्ता स्थापन करू शकते. त्यामुळे शिवसेनेला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Visit : bahujannama.com