बीड : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रेवडी पैलवान असून रेवड्यांवरच्या कुस्त्या आम्ही खेळत नाही अशी टीका शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. यावेळी बीडच्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी भाजपवर देखील पवारांनी शरसंधान साधले. भाजप प्रत्येक प्रश्नावर उत्तर कलम 370 सांगतात. मूलभूत प्रश्न राहिले बाजूला, राज्यातील शेतकरी, बेरोजगाराचा प्रश्न आहे उद्योग बंद पाडले आणि सांगतात 370 चा निर्णय म्हणे 56 इंच छातीने घेतला. ते कोण निर्णय घेणारे, हा निर्णय संसदेने घेतला असे म्हणत पवारांनी कलम 370 वर भाष्य केले.
भाजपला वाटते पंतप्रधानांशिवाय विजय नाही
महाराष्ट्रात सध्या सगळीकडे चर्चा परळीत देशाचे पंतप्रधान आले. गुरूवारी परळीत ते काय बोलायचं ते बोलले, परंतू परळीची जागा जिंकायची असेल तर पंतप्रधानांशिवाय दुसरा पर्याय नाही या निष्कर्शापर्यंत भाजपला यावे लागेल. परंतू मला खात्री आहे परळीची बहाद्दर जनता धनंजय मुंडेंनाच निवडून देईल. कारण सत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज आहे, हे तुम्हाला कळले आहे असे म्हणतं धनंजय मुंडे परळीतून निवडणूक जिंकणार असा विश्वास शरद पवार यांनी दर्शवला.
तसेच शहा, मोदी, योगी येऊन टीका करतात. पवारांनी काय केले ? खरंतर माझे नाव घेतल्याशिवाय यांची प्रचार सभाच पूर्ण होत नाही, ते झोपेत देखील तेच बडबडत असतील असा टोला देखील पवारांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लगावला. शरद पवार पुढे म्हणाले की भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, आमचा पैलवान तेल लावून तयार आहे पण समोर पैलवानच नाही. परंतू आम्ही रेवड्यावरच्या कुस्त्या खेळत नाही, माझ्या आयुष्यात मी चौदा निवडणूका लढवल्या त्यातल्या 7 केंद्रातल्या होत्या आणि 7 राज्यातल्या, परंतू एकदाही पराभव झाला नाही. आताच्या नव्या पिढीला पुढे आणून त्यांच्या हातात महाराष्ट्र सोपवायचा असल्याचे देखील पवार म्हणाले.
भाजपकडून लावण्यात येणाऱ्या ईडीच्या चौकशांवर पवार म्हणाले, भाजप सत्तेचा गैरवापर करुन खोट्य़ा केस लावते, चिंदबरम यांना आता आत टाकले, त्यांना निवडणूकीला तोंड देता येत नाही म्हणून खोटे खटले भरतात आणि दुसऱ्याला बदनाम करतात, माझ्यावर देखील खटला दाखल केला पण भाजपची पंचाईत झाली. अशा लोकांना सत्तेतून बाहेर घालावल्याशिवाय राहणार नाही. यावेळी पवारांनी केज आणि परळीतून पृथ्वीराज साठे आणि धनंजय मुंडे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन जनतेला केली. शरद पवारांच्या या सभेत व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, केज राष्ट्रवादीचे उमेदवार पृथ्वीराज साठे, जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Visit : bahujannama.com