नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमध्ये चालू असलेल्या राजकीय गोंधळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सतत ट्विट करत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांचे हे ट्विट चर्चेचा विषय बनत आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘महात्मा गांधी यांना मारण्यासाठी नथुराम गोडसेने ज्या बंदुकीचा वापर केला होता ती ग्वाल्हेरच्या परचुरेने उपलब्ध करून दिली होती.’ त्यांनी या ट्विट मध्ये शिंदेंचे नाव तर घेतलेले नाही, पण ते ग्वाल्हेर घराण्याचे असल्याने त्यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.
दिग्विजय यांनी शिंदेंना दिल्या शुभेच्छा
यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपमध्ये जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी “मी मानतो की शिंदेंनी अमित शहा किंवा निर्मला सीतारमन यांची जागा घेतली पाहिजे. मला त्यांच्या प्रतिभेबाबत माहिती आहे. ते निश्चितपणे चांगले काम करतील. कदाचित ते मोदी-शहा यांच्या संरक्षणासाठी पुढे जातील. तुम्हाला आमच्या शुभेच्छा महाराज.”
I agree with Pawan he should replace Amit Shah or Nirmala Seetharaman and knowing his talent he would certainly do a better job then either of them. May he grow under ModiShah Tutelage. Our best wishes to you Maharaj.
— digvijaya singh (@digvijaya_28) March 11, 2020
काय आहे पूर्ण कथा ?
आपल्या ट्विटमध्ये दिग्विजय यांनी ज्या परचुरेचे नाव घेतले आहे त्यांचे पूर्ण नाव डॉ. डीएस परचुरे होते. ते ग्वाल्हेरमध्ये एका हिंदू संघटनेचे प्रमुख होते. डॉ. परचुरेने आपल्या एका परिचित व्यक्तीकडून बंदूकीचा सौदा नथुराम गोडसेला ५०० रुपयात पिस्तूल रिव्हॉल्वर दिले होते. यानंतर त्याने स्वर्ण नदीच्या किनाऱ्यावर दहा दिवस फायरिंगचा सरावही केला होता. हात बसल्यावर तो महात्मा गांधींच्या हत्येसाठी दिल्लीला रवाना झाला होता. त्यावेळी शिंदेंना राज्यात बंदूक किंवा पिस्तूल खरेदीसाठी परवाना आवश्यक नव्हता, म्हणून गोडसेने रिवॉल्व्हर खरेदी करण्यासाठी ग्वाल्हेरची निवड केली.
ग्वाल्हेर घराण्याचे आहेत शिंदे
ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे प्रतिष्ठित ग्वाल्हेर घराण्यातील असून ग्वाल्हेर घराण्याची राजमाता विजयाराजे शिंदे यांनी १९५७ मध्ये कांग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली होती. ते गुना लोकसभा मतदारसंघातून खासदार बनल्या होत्या. केवळ १० वर्षातच त्यांचा मोहभंग झाला आणि १९६७ मध्ये त्या जनसंघात गेल्या. त्यांच्यामुळे ग्वाल्हेर क्षेत्रात जनसंघ मजबूत झाला आणि १९७१ मध्ये इंदिरा गांधींच्या लाटेनंतरही जनसंघाने इथे तीन जागा जिंकल्या. स्वतः विजयराजे यांनी भिंडमधून, अटल बिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे गुनामधून खासदार बनले.