नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘काँग्रेस नेते पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप हा पक्ष आता फक्त ‘राहू आणि केतूची खासगी कंपनी झाली आहे,’ असं म्हणत काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
जमकर खाया भी, ठोक के खिलाया भी।
लोगों की सरकार जनता के वास्ते नहीं, पूंजीपतियों के वास्ते।
बीजेपी बन गई राहु-केतु की प्राइवेट लिमिटेड कंपनी,
सबका साथ, अंबानी-अडानी का विकास।मोदी ने देश रख दिया गिरवी,
5 साल में 270 टन सोना गिरवी, भारत के सर पर चढ़ा 32 लाख करोड़ कर्ज़। pic.twitter.com/fSzsNOzpxD— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) May 10, 2019
सिद्धू’ म्हणाले कि, ‘सबका साथ आणि अदानी-अंबानींचा विकास,’ अशा प्रकारची भाजपा सरकारची विकसाबद्दलची भूमिका आहे या सरकारने जनतेचा फायदा न करता केवळ उद्योगपतींचा फायदा केला.भाजपा सरकार लोकांसाठी नाही तर भांडवलशहांसाठी आहे. ‘पंतप्रधान मोदींनी देश गहाण ठेवला आहे. पाच वर्षांत 270 टन सोनं गहाण ठेवून डोक्यावर 32 लाख कोटींचं कर्ज झालं आहे,’ असा गंभीर आरोपही सिद्धूंनी केला आहे.