श्रीनगर वृत्तसंस्था : जम्मू – काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणार कलम ३७० हटविल्यानंर राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यातील आरोप -प्रत्यारोप सुरूच आहेत. राज्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांच्या काश्मीरच्या भूमिकेबाबत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आरोपांचे युद्ध सुरु असताना राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जीभ घसरली. मलिक म्हणाले कि, ‘जर राहूल गांधी कलम ३७० चे समर्थन करत असतील, तर लोक त्यांना बुटाने मारतील.’ ‘राहुल गांधी हे देशातील प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. परंतु ते नवशिक्याप्रमाणे वागत आहेत. राहुल गांधींच्या वक्त्यव्याचा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे. गांधींकडून ही अपेक्षा नव्हती. ज्यावेळी देशात निवडणूक होतील, त्यांच्या विरोधात बोलण्याची गरज नाही. फक्त एवढंच सांगेल कि, जर राहुल हे कलम ३७० चे समर्थक असतील तर, लोक त्यांना बुटांनी मारतील.’
कलम ३७० हटविल्यानंतर मलिक यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी याना जम्मू – काश्मीर मुद्यावर भूमिका स्पष्ठ करण्यास सांगत म्हणाले कि, ज्यावेळी त्यांच्या पक्षाचा नेता संसदेत काश्मीर मुद्द्याला संयुक राष्ट्राशी जोडत होता, त्यावेळी राहुल गांधी यांनी बोलायला हवे होते.’ यावेळी मलिक यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी याच्यावर निशाणा साधताना म्हणाले कि, चौधरी बोलत असताना राहुल गांधी यांनी पक्षाचा नेता म्हणून त्यांना थांबवायला हवे होते. काश्मीर मुद्यावर आपल्या पक्षाची स्पष्ठ भूमिका मांडायला हवी होती. ‘
दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काश्मीर मुद्यासंदर्भात पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी सरकारवर हल्लाबोल केले. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यात पाकिस्ताननी लक्ष न घातलेलेच बरे, असे करून पाकिस्तान जम्मू काश्मीर मध्ये हिंसा पसरविण्याचे काम करत आहेत. असा आरोप राहुल यांनी पाकिस्तान सरकारवर लावला आहे. पाकिस्तान सरकारनं संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पात्रात राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याचा आधार घेतल्यानं राहुल गांधी हे ट्विट केल्याचं म्हंटल जात आहे.
त्याचप्रमाणे, काही दिसांपूर्वी राहुल गांधी यांनी काश्मीरमधील परिस्थितीवरून सरकारला धारेवर धरले होते. विरोधक आणि मीडिया ला निष्ठुर प्रशासनाची चव चाखायला मिळाली असल्याचं विधान त्यांनी केलं होत. त्यांचा इशारा हा यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाला काश्मीर खोऱ्यात जाण्याची परवानगी न देण्यासाठी होता.
J&K Guv says,"Rahul Gandhi ne political juvenile ki tarah behave kiya hai.Aaj UN mein Pak ki chithi mein uske bayanat darz hai… jis waqt desh mein chunav aayega unke virodhi ko kuch kehni ki zaroot nahi hai woh bas ye keh denge,yeh 370 ke himayati hai toh log juton se maarenge" pic.twitter.com/gqXQARPMNf
— ANI (@ANI) August 28, 2019