नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय मंचावरही पाकिस्तान अनेकदा काश्मीर मुद्द उपस्थित करताना दिसून आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही भारताबद्दल आक्षेपार्ह विधानं करत असतात. जोपर्यंत भारत काश्मीरमधील नागरिकांवरील अन्याय थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तान भारताशी कोणतीच चर्चा करणार नाही असं इम्रान खान म्हटल्याचं पाकिस्ताननं माध्यमांनी सांगितलं सांगितलंय असं ट्विट एएनआयनं केलं आहे. या ट्विटला आता प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
इम्रान खान यांच्या वक्तव्याच्या ट्विटला उत्तर देत कुमार विश्वास यांनी त्यांना भीक मागण्याचा सल्ला दिला आहे. कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे की, “ठिक आहे पुन्हा आपला कटोरा उचला आणि जागतिक भीक मागू टुरला निघा.” असे म्हणत ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/DrKumarVishwas/status/1174296525620436992
सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूपच वाईट झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने भारतासोबत असलेले व्यापारी संबंध तोडले होते. सध्या पाकिस्तानमधील दैनिंदिन गरजेच्या वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. आपली आर्थिक स्थिती बिकट असणाऱ्या पाकिस्तानने भारतासारख्या सक्षम देशाला हल्ल्याचीही धमकी दिली आहे. सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानला आर्थिक मदत देणे अनेक देशांनी बंद केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्त्रोतांनाही खिळ बसली आहे.
Visit : bahujannama.com